त्या दिवशी अचानक,
डोळ्यात पाणी आलं,
आईने कारण विचारलं,
भूक लागली समजून,
तिने भाकरी भाजून दिली,
मग बायकोचं येणं झालं,
आयुष्यात नाविण्यासहित,
परत एकदा तसंच,
डोळ्यात पाणी आलं,
यावेळीही प्रेमाची भूक भागली,
पण ते समाधान नव्हतं,
मायेच्या उबेची गरज होती,
प्रेम ,माया सारखंच असतं,
मनाला ते कळत नाही,
आयुष्यात मायेची जागा ,
प्रेम कधीच घेऊ शकत नाही,
हे सत्य मी जाणलं,
त्या अचानक येणाऱ्या पाण्याचं,
रहस्य आज मला कळलं
No comments:
Post a Comment