राजा होता एक मनाचा ,
जणू मालकच स्वतंत्र्याचा,
प्रेमाच्या युद्धात बिचारा ,
गुलाम झाला एका तरुणीचा ,
फक्त सुखाचा पाऊस होता ,
स्वप्ने होती त्या उनाड सरीची,
थेंबाथेंबाला जणू प्रेमच झालेले,
मन राजाचे सखीतच गुंतलेले ,
अनावर ती उसळी प्रेमाची ,
तोडायची होती बंधने जगाची ,
राजाने आज धाडस केले,
वेडीला त्या लग्नासाठी विचारले ,
प्रतिसाद जणू एक वारच झाला ,
हा भाव तिने अनोळखी केला ,
प्रेमाला त्याच्या तिने नाकारले ,
डोळ्यातून त्याच्या रक्ताश्रू वाहिला ,
पाऊस त्याला देई चटके ,
धुक्यात तो घुसमटला ,
स्वप्ने जळताना सरीची ,
मनापासून तोही जळला,
राज्य सांभाळायचे होते त्याला ,
त्यानेच मग स्वतःला सावरला ,
अश्रू डोळ्यात तेवत असताना ,
आगीला तो पिऊन गेलेला ,
नशीबाने त्याला बंधने घातली,
त्याचेही आता लग्न झाले ,
प्रियेची ती जाणीव नव्हती ,
राजाचे आज जगच बदलले ,
प्रणयाची रात्र वेगळी ,
गुलाब काट्यांचे मिलन होते,
तिच्या सावलीत जगताना ,
प्रेमांकुर फुटत होते ,
राज्याच्या पदरी आज ,
एक कळी(मुलगी) एक वाघ होता,
भूतकाळाचा भाव बिचाऱ्याला,
कधीतरी सतावत होता ,
सखी आज परत आली ,
आजूबाजूला नाचू लागली ,
दुर्लक्ष करताच राजाने ,
प्रश्न ती मांडू लागली ,
कस आठवलं सखे पान तुला मागचं,
चुरगळून टाकलस जे होतं स्वतःचं,
भेग काचेची परत जुळणार नाही ,
आयुष्यात सखी भूतकाळाची खुणा नाही ,
क्षितीज नवं सापडलाय मला ,
राणीच्या प्रेमानेच जगवलंय मला ,
तनामनात नाही श्वासात आहे ती ,
शिवाय तिच्या मी काहीच नाही ,
(राजा)
खेळावेसे वाटले तर मनाशी खेळू नको,
परत सखे कोणाचे मन तोडू नकोस,
चालवत नसेल दोन पावले प्रेमाची तर ,
पायात दुसऱ्याच्या खोट्या बेड्या घालू नकोस ,
कोण होणार होती राणी ,
कोण हे होऊन बसले ,
राजा राणीचा संसार बघून ,
प्रेम स्वतःहून त्यात फसले
आणि राजा राणी दोघेही हसले